आरक्षणाची पोटदुखी
Aarakshan acchi potdukhi
देशमुख : ढोबळेसाहेब महात्मा फुले खरेच महान होते. त्यांच्या कृतीला व विचारांना मी त्रिवार अभिवादन करतो. वर्णव्यवस्थेवर अजून काही माहिती सांगा.
मी : आर्यब्राम्हण हे मूळचे विदेशी. लोकमान्य जे की ब्राम्हण होते त्यांनी ही गोष्ट त्यांच्या 'आर्टिक्ट होम ऑफ वेदाज' मध्ये स्वत:च मान्य केली आहे. पंडीत नेहरुंनीही 'डिस्कवरी ऑफ इंडीया' ह्या ग्रंथात ही बाब मान्य केली आहे. महात्मा फुलेंनीही ब्राम्हणांना विदेशी आर्य-ब्राम्हण असे म्हटल आहे. ही गोष्ट ऐतिहासिक व सामाजिक विश्लेषणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. प्रश्न हा समतावादी मानवतावादी व्यवस्था निर्माण करण्याचा आहे. आर्य-ब्राम्हण हे हजारो वर्षापूर्वी ह्या भारतभूमीवर स्थायी झाले, त्यामुळेच आज ते ह्याच देशाचे रहिवासी आहे असेच आपण मानले पाहिजे व त्यांनीही स्वत:च्या भारतीयकरणाची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. आम्ही ब्रिटीशांचे गुलाम होतो. आम्ही स्वातंत्र मिळविले आणि ब्रिटीशांना स्वत:ची युरोपमध्ये समृद्ध मायभूमी असल्यामुळे ते परत गेले. तसे ब्राम्हणां संदर्भात नाही.
देशमुख : ढोबळेसाहेब आर्यब्राम्हणा प्रमाणेच मुसलमान हे ही विदेशी आक्रमक आहेत. ह्या बाबत आपले काय म्हणने आहे ?
ढोबळे : ब्राम्हण व मुसलमानांच्या संदर्भात खोलात विश्लेषण केले तर असे आढळते की ब्राम्हण हे समुह म्हणून ह्या देशात आले तर इस्लाम हा धर्म एक विचारधारा म्हणून आला आणि येथील लोक मोठ्या संख्येत मुसलमान झाले. हजारो वर्षापूर्वी आलेल्या आर्यब्राम्हणांची लोकसंख्या तेव्हाही ५ टक्के होती व आज हजारो वर्षानंतरही ५ टक्के आहे. तर फक्त १२०० सैन्य घेउन आलेल्या बाबराची ६-७ शतकाआधी लोकसंख्या फक्त ०.१ टक्के एवढी वा त्यापेक्षा कमीच असूनही आज १४-१५ टक्के झालेली आहे. प्रजननशक्तीमुळे एवढी लोकसंख्या वाढू शकत नाही. आपल्या बहुजन समाजातील बहुतांशी लोक मुसलमान झाल्याचे हजारो दाखले मिळतील, पण आपल्यातील एखादाही व्यक्ती ब्राम्हण झाल्याचा एकही दाखला इतिहासात मिळणार नाही. कारण जातीव्यवस्थेच्या धार्मिक कडक व्यूहरचनेमुळे ते होणेच कठीण होते. त्यामुळे असे म्हणता येईल की भारतीय मुसलमान हे आमचे रक्तबंधू आहे तर भारतीय ब्राम्हण हे आमचे धर्मबंधू आहेत. ज्यावेळेस आर्यब्राम्हण ह्या देशात आले तेव्हा ते रानटी टोळ्यांसारखे भटकत. त्यांच्या आगमनापूर्वी या देशात समृद्ध अशी सिंधू संस्कृती नांदत होती. आर्यब्राम्हण अतिशय क्रूर, धूर्त व रानटी असल्यामुळे त्यांनी इथल्या अहिंसक व शांतीप्रिय बहुसंख्याक लोकांना पराभूत करून आपले राज्य प्रस्थापित केले. राज्य स्थापन केल्यावर ते चालवावे कसे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यामुळेच आर्यब्राम्हणानांनी येथील लोकांना गुलाम ठेवण्यासाठी राज्य करण्याची पद्धती म्हणून वर्णव्यवस्था लादली. ह्या वर्णव्यवस्थेनुसार चार वर्ण मानण्यात आले. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र. बहुजन समाजाच्या पचनी ही वर्णव्यवस्था पडावी म्हणून गीतेत शुद्र वर्णाच्या गवळयाचे पोर असलेल्या कृष्णाच्या तोंडात 'चातुर्वर्ण्या मया सृष्टीम्' असे वाक्य टाकून दिले. जेणेकरून ही व्यवस्था ब्राम्हणांनी निर्माण केली नसून शुद्र वर्णीय कृष्णानीच म्हणजेच आमचीच व्यवस्था आहे असा आभास बहुजन समाजात निर्माण व्हावा. ही ब्राम्हणी कसब होती. ह्या वर्ण व्यवस्थेबाबत मनुस्मृतीत श्लोक आहे.
ब्राम्हणस्य तपो ज्ञानं तपः क्षत्रस्य रक्षणम् । फगामा
वैशस्य तु तपो वार्ता तपः शूद्रस्य सेवनम् ।।
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजेच विद्या नसल्यामूळे शुद्राच्या बुद्धीचा हास झाला. बुद्धीच्या नाशामुळे स्वत:च्या प्रगतीची धोरण चुकलीत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती व एकुणच परिस्थीती ढासळली. ह्या परिस्थीतीवर मात करायची असेल तर सर्वप्रथम सर्वदूर शिक्षणाचा प्रसार झाला पाहीजे. शिक्षण म्हणजे निव्वळ चार वर्ग शिकणे नव्हे तर आपल्या बुद्धीचा उपयोग करणे शिकणे होय. आजही सुशिक्षीत बहुजन मंडळी सुद्धा बुद्धीचा हास झाल्यासारखी वागत आहे. समाजात निर्माण होणाऱ्या आयाराम-गयाराम बाबा-बुवांच्या नादी लागत आहे. कावळ्यांच्या छत्रीसारखे रोज नवनवीन बाबा निर्माण होत आहे. तुकडोजीमहाराज वा गाडगेबाबा सारखे संत आपले कलर पोस्टर छापून वा भक्तांना स्वत:चे बिल्ले लटकावून फिरा असे कधीच सांगत नसत. पोस्टर छाप व बिल्लेबाज बाबामहाराज सरळसरळ टिव्हीसारख्या वैज्ञानिक साधनाचा उपयोग करून अवैज्ञानिक गोष्टी समाजात फैलवत आहेत. चिंध्याचे कपडे घालणारे व फुटक्या मडक्यात अन्न खाणारे गाडगेमहाराज एकीकडे तर हजारो एकर जमिनीत आश्रम बांधून, ऐशारामाचे जीवन जगणारे व लाखो रुपयांच्या ए. सी. गाड्यात प्रवास करणारे हे बाबामहाराज दुसरीकडे. दोन टोकं. ह्यातील जे बाबामहाराज बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आपले जीवन खर्चीत असतील त्यांना मात्र माझे अभिवादन.