बहुजनांचे मारेकरी
Bahujananche Marekari prastavana
बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
वैदिक ब्राम्हण हे स्वत:ला कधीच हिंदू म्हणऊन घेत नसत. इतिहासात हिंदू धर्माची कधीही स्थापना करण्यात आली नव्हती.या धर्माला कोणताही संस्थापक नाही.हिंदू धर्माचा असा कोणताही धर्मग्रंथ नाही. हिंदू ह्या शब्दाच्या निर्मितीमागील इतिहासकार दोन पर्याय सांगतात. पहिला हिंदू हा शब्द सिंधू या शब्दाचा अपभ्रंश आहे तर दुसरा हिंदू हा शब्द अरबानी दिलेला आहे. इथल्या मूळ लोकाकडे अरब मागास, लाचार या नजरेने बघत त्यामुळे तुच्छ भावनेतून शिवीच्या स्वरुपात हिंदू हा शब्द अरबानी वापरला व मळच्या जनतेला अपमानास्पद वागणूक देताना हिंदू हा शब्द वांरवार वापरुन स्वत:चे मनोरंजन करुन घेतले. परंतु त्यानी वापरलेला शब्द अपमानकारक आहे याची जाणीव नसल्याने भारतीयांनी तो शब्द स्विकारला आणि कालांतराने 'अज्ञानातच सुख असते ' या न्यायाने त्याच शब्दाला धर्माशी जोडून हिंदू धर्म असे नाव पाडले. भट-ब्राम्हणाने हिंदू हा शब्द सुरुवातीस नाकारला. जेव्हा अकबर व औरंगजेबाने हिंदूवर कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा आम्ही हिंदू नसल्यामुळे जिझीया कर आम्हाला बंधनकारक नाही. जिझीया करातून आम्हाला मुक्त करावे. अशा प्रकारची विनंती येथील ब्राम्हणांनी अकबर व औरंगजेबाकडे केली होती. परंतु हिंदु या शब्दात जेव्हा वैदिक ब्राम्हणांना फायदा दिसायला लागला तेव्हा या शब्दाला असे कवटाळले की जणू तेच या शब्दाचे निर्माते आहेत.