बहुजनांचे मारेकरी
Bahujananche Marekari prastavana
बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
कृष्ण हा यादव कुळाचा, गवळी समाजाचा शुरवीर होता. पण आर्य ब्राम्हणांच्या नादी लागला. आर्यांच्या सांगण्यावरून त्याने स्वकुलाचा सर्वनाश केला. कंस व जरासंघ हे महापराक्रमी राजे होते. त्यानी आर्य ब्राम्हणांचे वर्चस्व अमान्य केले. वर्णाश्रम धर्माला झिडकारत समतेचे तत्व रुजविण्यास त्यांनी सुरुवात केली. आर्य ब्राम्हणाला त्यानी आव्हान दिले. आमच्या विशेषाधिकाराला आव्हान देणा-याचा सर्वनाश केल्याशिवाय आम्ही सुखी होऊ शकणार नाही. हे वैदिकांनी ताडले व कंसाचा नायनाट करण्यासाठी त्यानी आर्येत्तरातील श्रीकृष्णाची निवड केली. कृष्णाला फितुर करुन त्याचे मार्फत आपल्या विरोधकाना आर्यानी नेस्तनाबूत केले. श्रीकृष्णाच्या नावावर अनेक चमत्कारीक कथा लिहल्या. त्याच्या बाललीला रंगविल्या तर कंसाला क्रूर व पापी दाखविण्यात आले. अशा अनेक कथा बहुजन समाजात प्रसृत करण्यात आल्या व बहुजन समाजाने त्या सत्य म्हणन स्विकारल्या. आांनी कष्णालाही एका विदुषकाच्या स्वरुपात बहुजनसमोर प्रस्तुत केले. कृष्णाला हजारो स्त्रियांचा नवरा ठरवून त्याची बदनामीही केली. स्त्रियांसी लगट करणारा, त्यांचे कपडे लपवणारा व खोड्या करणारा,ब्राम्हणी व्यवस्थेच्या रक्षणकर्ता असे बहुजनाच्या कृष्णाला चित्रीत केले.