बहुजन नायक कांशीराम
Bahujan Nayak Kanshiram
बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
फुले - शाहु - आंबेडकर व पेरीयार यांचा वारसा सांगत अतिशुद्र जातीच्या आर्थिक, सामाजीक, सांस्कृतीक कार्यक्रमाबाबतचे पर्याय शुद्र जातीपुढे ठेवून ब्राम्हणवाद विरोधी सुत्राची मांडणी केली. भाईचारा बनाओ चा कार्यक्रम राबवून फुल्यांच्या शुद्रादीशुद्र व अस्पृशांची एकता या भुमिकेशी त्यांनी नाळ जोडली.साधन - संपत्तीहीन, ग्रामीण भागात विखुरलेल्या अस्पृश्य जातीना व समाजऋण परत करावयाचे आहे ही भावना असलेल्या आंबेडकरी नोकरवर्गाला एकत्र करुन सत्तास्पर्धेत हस्तक्षेप करण्याची निर्णायक क्षमता कांशीरामजीनी हस्तगत केली. माझ्या समाजाच्या हितासाठी मी कोणाशीही युती करु शकतो.त्यासाठी मला कोणी संधीसाधू म्हटले तरी चालेल अशी भूमिका कांशीराम घेतात. ऊत्तर प्रदेशात भाजपाच्या साह्याने सत्ता हातात घेतली असली तरी भाजपाच्या डोक्यावर लाथ ठेऊन शंभर टक्के आंबेडकरवाद अंमलात आणला हे बहुजन समाज पक्षाचे विरोधकही मान्य करतात.
बहुसंख्येने असलेल्या महारामध्ये राजकीय सत्ता स्वत:च्या हाताने हिसकावून घेण्याची मनस्थिती नाही या बद्दलची चीड कांशीरामजीच्या मनात सतत सलत होती. महारानी दुसऱ्याचे लांगुलचालन करण्यापेक्षा सत्तेच्या किल्ल्या स्वत:च्या हातात घेण्यासाठी पेटून उठले पाहीजे असे त्यांना वाटत असे. म्हणून ते कधी कधी चिडून, ये महार कभी नहीं सुधरेंगे असेही म्हणत. यात महाराबद्दल कसलीही द्वेषभावना कांशीरामजीच्या मनात नव्हती तर चिडून तो देनेवाला समाज बनावा याची प्रेरणा त्यातून निर्माण व्हावी असा हेतू होता.
आजची खरी सत्ता पुढाऱ्यांच्या हातात नसून ती नोकरशहांच्या हातात आहे. त्यामुळे नोकरशाहीच्या चौकटीत बदल करुन बहुजन समाजाचे अधिकारी येतील व त्यांना साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते असतील तेव्हा बहुजन समाज कसा असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे करा. प्रशासन व्यवस्था बहूजनाची असेल, उद्योग व व्यापारात बहजन समाजाचा पुढाकार असेल. गरीबच गरिबी हटविणारे बनले तर देश समृध्द होईल की नाही ? याचा विचार करा. हेच कांशीरामजींचे मिशन होते. त्यांचे स्वप्न होते देशातील मुलनिवासी या देशाचा सत्ताधारी व्हावा.